औरंगाबाद जिल्ह्यात 43618 कोरोनामुक्त, 506 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 26 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 66 जणांना (मनपा 54, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43618 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45322 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1198 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 506 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (19)भवानी चौक (1), समृद्धी पार्क (1), एन चार सिडको (2), एसबीआय मुख्यालय परिसर (1), एन पाच सिडको (1), कौशल नगर, जालना रोड (1), अलोक नगर (2), मनपा परिसर (1), एल अँड टी कंपनी (1), एन अकरा मयूर पार्क (1), हनुमान नगर (1), अन्य (6)

ग्रामीण (14)माळीवाडा (1), वाळूज (1), बजाज नगर (2), अन्य (10)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत ठाकरे नगरातील 75 वर्षीय स्त्री, खासगी रूग्णालयात एन तीन सिडकोतील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.