औरंगाबाद जिल्ह्यात 66 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 43451 कोरोनामुक्त, 556 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 24:औरंगाबाद जिल्ह्यात आज 105 जणांना (मनपा 92, ग्रामीण 13) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 66 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45200 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1193 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 556 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (55) एन-7 सिडको (1), राधास्वामी कॉलनी (2), बन्सीलाल नगर (1), एपीआय कॉर्नर, सिडको (1), सिडको (1),पगारिया कॉलनी (1),पुंडलिक नगर (1),शहानुरवाडी (1),हर्सूल(1), टीव्ही सेंटर (1), योगायोग सोसायटी, एन 12 (2), सिडको एन-6 एमजीएम हॉस्पीटलसमोर (1), पिसादेवी जयहिंद नगर (1), अन्य (40)

ग्रामीण (11) बजाजनगर (1),पाल, फुलंब्री (1), अन्य (9)

एक कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत एन-5 सिडको 55 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.