औरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद, दिनांक 21 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 58 जणांना (मनपा 48, ग्रामीण 10) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 43204 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44972 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1189 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 578 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (55) हरसिद्धी नगर (7), बजाज नगर (1), घाटी परिसर (1), मिल कॉर्नर (1), एन-6 सिडको (1),पुंडलिक नगर (1),बनेवाडी (1), रेल्वे स्टेशन (1),एन-8 सिडको (1), जहागिर कॉलनी (1), समतानगर (1), सेवा नगर (1), मुरलीधर नगर (2), उल्कानगरी (1), ओम नगरी, बीड बायपास (2), अन्य (32)

ग्रामीण (04) सिल्लोड (1), (3)अन्य

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत दर्जी बाजार, छावणीतील 76 वर्षीय पुरूष, सुदर्शन नगरातील 56 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात 44 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.