औरंगाबाद जिल्ह्यात 42906 कोरोनामुक्त, 525 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 16 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 जणांना (मनपा 40, ग्रामीण 14) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42906 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 87 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44609 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1178 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 525 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (70) एन तीन सिडको (1), सूतगिरणी चौक परिसर (1), एन सात सिडको (4), बालाजी नगर (1), औरंगपुरा (1), वेदांत नगर (1), ठाकरे नगर (1), उल्कानगरी (1), पेठे नगर (1), सारा सिटी (1), दर्गा रोड (3), नक्षत्रवाडी (1), पवन नगर (2), नंदनवन कॉलनी (1), समर्थ नगर (1), आकाशवाणी परिसर (1), अलका नगर (1), एन दोन (1), मुकुंदवाडी (1), एन पाच सिडको (1), अमृतसाई सिटी (1), बंजारा कॉलनी (1), न्यू उस्मानपुरा (1), सिल्क मिल कॉलनी (1), पटेल नगर, बीड बायपास (1), अन्य (39)

ग्रामीण (17)नाथ गल्ली, पैठण (1), सोलेगाव, गंगापूर (1), जय भवानी नगर, वडगाव (1), नागनाथ नगर, वैजापूर (1), अन्य (13)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत होनाजी नगरातील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.