औरंगाबाद जिल्ह्यात 92 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 41863 कोरोनामुक्त, 911 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 6 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 75 जणांना (मनपा 40, ग्रामीण 35) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41863 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 92 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43932 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1158 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 911 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा(70) एन वन (5), पुंडलिक नगर (1), नारेगाव (1), एन सात त्रिवेणी नगर (2), हरिकृपा नगर, देवळाई (1), पेठे नगर (1), उर्जा नगर, सातारा परिसर (1), ऑडिटर सो., (1), विवेक नगर, एन दोन सिडको (1), मयूर पार्क (6), जाधववाडी (1), दिवाणदेवडी, गुलमंडी (1), छत्रपती नगर (1), बालाजी नगर (1), अरिहंत नगर (1), मार्ड हॉस्टेल (1), रामगोपाल नगर (2), रचनाकर कॉलनी (1), हर्सुल, फुले नगर (1), एन सहा साई नगर (1), चेतना नगर (1), अन्य (38)

ग्रामीण (22) स्वरूप नगर, लासूर स्टेशन गंगापूर (1), आलापूर (1), सिल्लोड (1), कन्नड (2), अन्य (18)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत शहरातील एन नऊ एच, श्रीकृष्णा नगर येथील 48 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.