औरंगाबाद जिल्ह्यात 80 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 41788 कोरोनामुक्त, 895 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 05 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 108 जणांना (मनपा 87, ग्रामीण 21) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41788 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 80 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43840 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1157 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 895 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (68) फकीरवाडी (1), शिवाजी नगर , गारखेडा (1), एन 13 वानखेडे (1), एन 9 श्रीकृष्ण नगर (1), हर्सूल (1), चिकलठाणा (1), मयूर पार्क (2), नारळीबाग (1), राधेशाम कॉम्पलेक्स, नारळीबाग (3), म्हाडा कॉलनी (3), मल्हार चौक (1), गजानन नगर (1), छत्रपती नगर (1), आदीनाथ सुवास्तु बीड बाय पास (1), मिलेनियम पार्क हौसिंग सोसायटी (1), एन 2 सिडको (1), सातारा परिसर (1), छत्रपती नगर, गारखेडा (1), मंदीप नगर, आकाशवाणी (1), झेड पी कॉटर्स (1), विश्रांती नगर(1), सातारा परिसर (1), घाटी परिसर (2), होनाजी नगर (1), हर्सुल पिसादेवी रोड (1), विनायक कॉलनी, एन दोन सिडको (1), मिलिंद नगर, उस्मानपुरा (1), एन चार सिडको (1), समर्थ नगर (1), काल्डा कॉर्नर (1), बजरंग चौक, श्री कॉलनी (1), एन दोन राम नगर (1), टिळक नगर (1), अन्य (29)

ग्रामीण (12) पंढरपूर नाका (1), सारा इलाईट सिडको, महानगर-1 तीसगाव (1), काथापूर, पैठण (1), अन्य (9)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत शहानूरवाडी येथील 71 वर्षीय पुरूष, पैठण तालुक्यातील बाला नगरमधील 84 वर्षीय पुरूष आणि खासगी रूग्णालयात पहाडसिंगपुरा येथील 56 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.