औरंगाबाद जिल्ह्यात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

जिल्ह्यात 39707 कोरोनामुक्त, 578 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 149 जणांना (मनपा 119, ग्रामीण 30) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39707 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 59 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41397 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1112 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 578 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (46) देशमुख नगर (1), नुपूर अपार्टमेंट (1), न्यू सातारा परिसर (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (1), टीव्ही सेंटर (1), एन तीन सिडको (1), अहिंसा नगर, आकाशवाणी (1), एन आठ सिडको (1), दिवाणदेवडी (1), गुरूराम नगर (1), व्यंकटेश नगर (1), विजय नगर (2), उल्कानगरी (1), राजीव गांधी नगर (1), चिकलठाणा (1), एन तेरा, वानखेडे नगर (1), नारळीबाग (1), मिाटमिटा (1), न्यू श्रेय नगर (1), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप जवळ (1), अन्य (25)

ग्रामीण (13) वैजापूर (1), आनंद हॉस्पीटल परिसर, वैजापूर (1), मनूर, वैजापूर (1), पारिजात नगर, तिसगाव (2), म्हाडा कॉलनी (1), खुलताबाद (1), अन्य (6)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत शहरातील प्रगती कॉलनीतील 76 वर्षीय पुरूष, टीव्ही सेंटर येथील 60 वर्षीय पुरूष आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव येथील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.