मुंबई इंडियन्स! पाचव्यांदा जिंकलं IPL विजेतेपद

Image

दुबई, 10 नोव्हेंबर : रोहित शर्माच्या मुंबई (Mumbai Indians)ने पुन्हा एकदा आपणच आयपीएलचे किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या फायनलमध्ये मुंबईचा दणदणीत विजय झाला आहे. या मॅचमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)ने केलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

दिल्लीने दिलेल्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात धडाक्यात झाली. डिकॉक आणि सूर्याने मुंबईला 4.1 ओव्हरमध्येच 45 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. रोहित शर्माने 51 बॉलमध्ये 68 रनची खेळी केली. तर इशान किशनने 19 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले. दिल्लीकडून नॉर्कियाने 2 आणि कगिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिसला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण मुंबईच्या ट्रेन्ट बोल्टने पुन्हा एकदा दिल्लीला सुरुवातीलाच धक्के दिले. मार्कस स्टॉयनिस मॅचच्या पहिल्याच बॉलला आऊट झाला, यानंतर पुढच्याच ओव्हरला बोल्टने रहाणेला माघारी धाडलं. तर जयंत यादवने शिखर धवनला बोल्ड करून दिल्लीची अवस्था 22-3 अशी करुन ठेवली. यानंतर मात्र कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी सूत्र हातात घेतली. या दोघांमध्ये 96 रनची पार्टनरशीप झाली.

ऋषभ पंत 38 बॉलमध्ये 56 रन करून आऊट झाला, तर श्रेयस अय्यरने 50 बॉलमध्ये नाबाद 65 रन केल्या केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर कुल्टर-नाईलला 2 आणि जयंत यादवला 1 विकेट मिळाली.

१५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितने मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्याने ५१ चेंडूत दमदार ६८ धावा कुटल्या.मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा उपयुक्त खेळी करून दाखवली. कर्णधारपदाला साजेशी खेळी करत रोहितने ३६ चेंडूमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने अर्धशतक झळकावले.

Image

मुंबईची टीम 13 आयपीएलमध्ये सर्वाधिक पाचव्यांदा चॅम्पियन ठरली आहे. याआधी 2013, 2015, 2017, 2019 आणि आता 2020 साली मुंबईने आयपीएल ट्रॉफी पटकावली आहे. लागोपाठ 2 आयपीएल जिंकण्याच्या चेन्नईच्या रेकॉर्डशीही मुंबईने बरोबरी केली आहे. याआधी चेन्नईने 2010 आणि 2011 साली आयपीएल जिंकली होती.