औरंगाबाद जिल्ह्यात जिल्ह्यात 39431 कोरोनामुक्त, 673 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 10 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 75 जणांना (मनपा 49, ग्रामीण 26) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 39431 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 72 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41212 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1108 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 673 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (58) भगतसिंग नगर (3), सिडको (1), हर्सुल (1), गणेश नगर (1), विष्णू नगर (1), खिंवसरा नगर (1),  रणजीत नगर, काल्डा कॉर्नर (1), सारा राज नगर, गारखेडा (1), डिलक्स नगर (1), व्यंकटेश नगर (1), घाटी परिसर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सिडको एन सहा (1), नाईक नगर (1), शांतीनिकेतन कॉलनी , त्रिमूर्ती चौक (1), एन नऊ रायगड नगर (1), वेदांत नगर (1), एसबीआय, औरंगाबाद शाखा (1), अहिंसा नगर (1), केसरसिंग पार्क (2), दिवाणदेवडी (1) अन्य (34)
ग्रामीण (14) रांजणगाव (पोळ) (1), राम नगर, पैठण (1), साई नगर, बजाज नगर (1), माऊली हॉस्पीटल, पैठण (1), लासूर रोड, गंगापूर (1), सिलेगाव (1), गंगापूर (1), अन्य (7) 

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात एसबीओए शाळेच्या समोरील 73 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.