औरंगाबाद जिल्ह्यात 36807 कोरोनामुक्त, 331 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 01 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 198 जणांना (मनपा 151, ग्रामीण 47) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 36807 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 69 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38210 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1072 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 331 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 18 आणि ग्रामीण भागात सहा रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (35)संभाजी कॉलनी (1), पोलिस कॉलनी, क्रांती चौक (2), पुंडलिक नगर (1), देवळाई परिसर (1), विद्युत कॉलनी (1), पोलिस क्वार्टर, मिल कॉर्नर (1), एन अकरा हडको (1), आलमगीर कॉलनी (3), उस्मानपुरा (1), बीड बायपास (2), बन्सीलाल नगर (1), कासलीवाल मार्बल (1), गजानन नगर (1), विठ्ठल नगर (1), गुलमंडी परिसर (1), शिवाजी नगर (4), एन अकरा सिडको (2), अयोध्या नगर (2), श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी (1), अन्य (4), सौजन्य नगर (1), सुपारी हनुमान मंदिर परिसर (1),हिमायत नगर (1)

ग्रामीण (16) कन्नड (1), पैठण (2), टाकळी कन्नड (1), धोतरा सिल्लोड (1), शंकर नगर, वैजापूर (1), वाणी वस्ती, वैजापूर (1), वैजापूर (1), भागगाव, वैजापूर (2), पळशी (1), गंगापूर (1), सिल्लोड (4)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत फुलंब्री तालुक्यातील सोनारी येथील 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.