औरंगाबाद जिल्ह्यात 98 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 36609 कोरोनामुक्त, 461 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 31 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 185 जणांना (मनपा 121, ग्रामीण 64) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 36609 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 98 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 38141 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1071 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 461 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून 25 आणि ग्रामीण भागात 16 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (47) पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर (1), विद्युत कॉलनी, बेगमपुरा (1), नवजीवन कॉलनी (3), आलमगीर कॉलनी (1), औरंगपुरा (1), नारळीबाग (1), कासलीवाल मार्बल, बीड बायपास (1), शिवाजी नगर (2), एन चार सिडको (1), हनुमान नगर (1), मिटमिटा (1), कांचनवाडी (1), जालन नगर (2), अन्य (1), स्वप्ननगरी (1), ज्योती नगर (1), मल्हार नगर, सातारा परिसर (1), गजानन नगर, गारखेडा (1), विष्णू नगर (1), म्हाडा कॉलनी (2), सातारा परिसर (2), विठ्ठल नगर (1), आयोध्या नगर (3), एन तेरा, भारत नगर (1), एन आठ, सिडको (7), गारखेडा (1), एन नऊ, श्रीकृष्ण नगर (1), लक्ष्मी कॉलनी (1), घाटी परिसर (1), संजय नगर (1), मनीष नगर (1), एन अकरा हडको (1), एन वन सिडको (1)

ग्रामीण (26) टाकळी, कन्नड (2), विष्णू नगर, कन्नड (1), दत्त नगर, रांजणगाव (1), जिकठाण (1), दारेगाव, खुलताबाद (1), लासूर (1), वाळूज एमआयडीसी (2), पळसखेडा (1), औरंगाबाद (2), गंगापूर (2), वैजापूर (7), पैठण (5)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.