पुन्हा जालन्यात दगडफेक आणि लाठीचार्ज
जालना ,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी लाठीचार्जची केल्याची घटना घडली. यानंतर आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्ये काही आंदोलकत आणि पोलीस जखमी झाल आहेत. यानतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. ठिकठिकाणी बंद पाळला जात आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर कालपुन्हा जालन्यात दगडफेक आणि लाठीचार्जची घटना समोर आली आहे. ग्रामीण भागातील घटनेनंतर आता जालना शहरात देखील हे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झालेल्या झटापटीनंतर दगडफेक करण्यात आली. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
आंदोलनाला हिंसक वळण
जालना येथील घटनेनंतर मराठा समाज प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तर बऱ्याच ठिकाणी वाहने देखील पेटवून देण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्ते अडवून तयार पेटवून देण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे आंदोलकांनी हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच कोणेही कायदा हातात न घेता हिसंक घटना करु नयेत असेही पोलिसांकडून सतत सांगण्यात येत आहे. तसेच पोलिसांचे परिस्थितीवर लक्ष असून, कोणेही अफवा पसरवू नयेत असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
आंदोलकांनी १६ बस जाळल्या;साडे चार कोटींचे नुकसान
जालना – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोळा आणि कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एक बस आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकल्या आहेत यात महामंडळाचे साडे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहीती विभागीय व्यवस्थापक प्रमोद मेहूलकर यांनी दिली.
आठ बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत त्यात साडेचार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.जालना जिल्ह्यात आतापर्यंत १६ सरकारी बस आंदोलकांनी जाळल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून शनिवार २ सप्टेंबर रोजी जालना विभागातून एकही बस बाहेरगावी सोडण्यात येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

अंबड चौफुली येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित रस्ता रोको आंदोलन आंदोलनकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला