शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  राज्यात अनेक भागात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे.मात्र सरकार नुकसानग्रस्त भागात वांझोट्या भेटी आणि घोषणा देत आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे. यासाठी आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार  असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली. 

  गारपीटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने कोणतंही दिलासा दिला नाही. सरकारने त्वरीत मदतीचा निर्णय घेतला पाहिजे असे दानवे म्हणाले.