मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद- फडणवीसांची घोषणा

मुंबई ,९ मार्च/प्रतिनिधी :-मराठवाड्याचा दुष्काळ  मिटवण्यासाठी  २० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. 

फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वॉटर ग्रीड निर्माण करण्याची कारवाई सुरु आहे. हर घर जल योजेन अंतर्गत मराठवाडा वाटर ग्रीड योजनेकरिता प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. तर मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 

मराठवाडा वॉटरग्रीडचे

प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी

– मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला

– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी

– बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी

– धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून धरणातून पाणी

तापी महापुनर्भरण प्रकल्प,

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प

– पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्प

– केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

– कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ

– या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता

सिंचन/पाणी

असे असतील नदीजोड प्रकल्प…

– दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून

– नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार

– मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार

– मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ

– वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ