जायकवाडीच्या जलविद्युत केंद्रातूनही पाण्याचा विसर्ग सुरू

 पैठण :जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री पडलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, प्रकल्पाच्या उजव्या कालव्यानंतर शुक्रवारी दुपारी जलविद्युत केंद्रातूनही १५८९ क्यूसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. 

मंजूर धरण प्रचलन आराखड्यानुसार आवश्यक पाणीपातळी ओलांडल्यानंतर, गुरुवारी संध्याकाळी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातन दोनशे क्यूसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. व धरणात पाण्याची आवक वाढल्यानंतर, जलविद्युत केंद्र व त्यानंतर धरणाच्या मुख्य साडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.गुरुवारी रात्री, जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सगळीकडे चांगला पाऊस पडला. परिणामी, शुक्रवारी सकाळपासून जायकवाडीत जवळपास अकरा हजार क्यूसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू झाली व धरणात ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *