जायकवाडी जलाशयाचे विधिवत पूजन

औरंगाबाद दिनांक 31 : जायकवाडी जलाशयाची पाणी पातळी 90 टक्के झाली आहे. या जलाशयाचे पूजन रोहयो मंत्री संदिपान भूमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांच्याहस्ते विधिवत पद्धतीने झाले.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे आदींसह जलसंपदा, जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पैठणमधील नागरिक उपस्थित होते. येथील पाण्याची आवक, साठा आदी बाबतची माहिती श्री. चव्हाण यांनी जाणून घेत,  आगामी काळात धरण भरण्याच्या अनुषंगाने सर्व आपत्ती व्यवस्थापन करण्यात यावे, असे निर्देश तहसीलदार यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *