ठाकरे सरकारच्या काळात सर्वांनाच पैसे द्यावे लागत : जे.पी.नड्डा

जग आर्थिक संकटात पण मोदींच्या काळात भारताचा वेगाने विकास

औरंगाबाद /चंद्रपूर,२ जानेवारी/प्रतिनिधी:-  ‘मविआ’च्या काळात उद्धव ठाकरेंसह सर्वांना पैसे द्यावे लागत होते. अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला आहे.

‘मविआ’ सरकारने दलाली आणि कमिशनखोरी केली, असा आरोप नड्डा यांनी केला. ते चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये आयोजित सभेत बोलत होते.औरंगाबाद भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, एजाज अहमद, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, बापू घडामोडे, राहुल लोणीकर आदींची भाषणे झाली.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना संदर्भ दिला बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रप्रेमाचा; पण तोंडी नाव मात्र देवरस यांचे ‘निवडणुकीपूर्वी मोदींनी ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा केली होती. पण नंतर खुर्चीच्या लालसेने उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला. राष्ट्रवादी विचारांसाठी बाळासाहेब ज्यांच्याशी आयुष्यभर लढले, त्यांच्याशीच उद्धव यांनी हातमिळवणी केली,’ असा आरोप नड्डा यांनी केला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली. मविआ सरकारने दलाली आणि कमिशन खोरी केल्यांचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन हिंदुह्दयसम्राटाच्या  मुलाने सीबीआयकडे तपास देण्यापासून मागे फिरले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला, पहिले उद्धव ठाकरेंना द्यावे लागत होते, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जावे लागत होते. उद्धव ठाकरेंना देखील काँग्रेसपुढे डोके टेकवावे लागत होते, अशी टीका नड्डा यांनी केली. प्रत्येकांकडे जात डोके टेकवण्याच्या नादात डोकं खाली करायची वेळ आली.पालघरला साधू्ंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यास उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना नकार दिला. सत्तेपुढे उद्धव ठाकरेंचे विचार छोटे झाले होते. 

उद्धव ठाकरेंना माफ करायचे का?

महाविकास आघडीमध्ये डिलरशीप, ब्रोकरेंज आणि ट्रान्सफर असा फंडा होता. खूप दुख: झाले होते की मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विरोधक असणाऱ्या लोकांसोबत उद्धव ठाकरेंनी सत्ता स्थापन केली. अशा लोकांना माफ करायचे का असा प्रश्न जे.पी.नड्डा यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय नागरिक भाग्यवान

संपूर्ण जग संकटाच्या काळात असताना, प्रत्येक देशावर आघात होत असताना भारतीय नागरिकांनी स्वत:ला भाग्यवान मानले पाहिजे, कारण या देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी केले. भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही पुढे घेऊन जात आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताने स्टील उत्पादन, मोबाईल निर्मिती, फार्मास्युटिकल, केमिकल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केली आहे. मोदी यांच्या धोरणांमुळे जग आज भारताकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे, असे जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

——————

जग आर्थिक संकटात पण मोदींच्या काळात भारताचा वेगाने विकास

औरंगाबाद;-संपूर्ण जग संकटाच्या काळात असताना, प्रत्येक देशावर आघात होत असताना भारतीय नागरिकांनी स्वत:ला भाग्यवान मानले पाहिजे, कारण या देशाचे नेतृत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिकूल परिस्थितीमध्येही पुढे घेऊन जात आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताने स्टील उत्पादन, मोबाईल निर्मिती, फार्मास्युटिकल, केमिकल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये चौफेर प्रगती केली आहे. मोदीजींच्या याच धोरणांमुळे जग आज भारताकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. ते सोमवारी चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आखलेल्या भाजपच्या मिशन १४४ आणि मिशन २५ या मोहिमांचा जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याप्रसंगी जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या भारताच्या विकासाचा पाढा वाचला.

ज्या ब्रिटनने आपल्यावर २०० वर्षे राज्य केले, मंदीच्या काळात त्याच ब्रिटनला मागे टाकून भारत आजघडीला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. सद्यस्थितीत अमेरिका, रशिया हे देश महागाईचा सामना करत आहेत. मात्र, भारत महागाई आटोक्यात आणून अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया रचत आहे. आजघडीला भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश झाला आहे. २०१४ पर्यंत भारतामध्ये ५२ टक्के मोबाईल फोन बाहेर यायचे. मात्र, आज ९७ टक्के मोबाईल फोनची निर्मिती देशात होत आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था कोलमडत असताना मोदीजींमुळे आपली अर्थव्यवस्था मजबूतपणे पुढे वाटचाल करत आहे, असे जे. पी. नड्डा यांनी म्हटले.

अमेरिकेत अजूनही लसीकरण पूर्ण झालेले नाही. मात्र, भारतात २२० कोटी लसीचे डोस दिले गेले. काँग्रेसचे नेते अशिक्षित आहेत. त्यांच्यामुळे देशात टीबी आणि पोलिओसारख्या आजारांच्या लसी येण्यासाठी अनेक वर्षे गेली. मात्र, कोरोनाची साथ पसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टास्क फोर्स स्थापन करून अवघ्या ९ महिन्यात कोरोनाच्या दोन लसी आणल्या. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे देशातील अतिगरिबी एका टक्क्यापेक्षाही कमी झाली. गरीब कल्याण योजनेतंर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मोफत धान्यामुळे हे शक्य झाले. या सगळ्यामुळे भारताकडे जगातील इतर देश वेगळ्यादृष्टीने पाहू लागले आहेत, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले.