वैजापूरनजीक समृध्दी महामार्गावर कारने अचानक पेट घेतला ; सुदैवाने जीवित हानी नाही
वैजापूर,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :-समृध्दी महामार्गावर धावत्या कारने अचानक पेट घेतला. या कारमधून प्रवास करणारे बुलढाणा येथील राजपूत कुटुंबिय प्रसंगावधान राखत कारच्या बाहेर पडल्यामुळे पुढील अनर्थ टळला. वैजापूर शहरानजीक गलांडे वस्तीजवळ गुरुवारी (ता.15) सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गावरून साखरखेडा ( बुलढाणा ) येथील राजपूत कुटुंबीय शिर्डीमार्गे पुण्याला कारने (एम.एच.14, ई.व्ही.7939) जात असताना वैजापूर शहरानजीक असलेल्या गलांडे वस्तीजवळ त्यांच्या कार ने अचानक पेट घेतला.काही क्षणातच कार ला मोठी आग लागली. प्रसंगावधान राखत राजपूत कुटुंब कारच्या बाहेर पडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी धावले व कारला लागलेली आग विझवली.या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र कार चे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.