अल्पवयीन बहिणीवर बळजबरी बलात्‍कार:भावाला २० वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद, २२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- घरात कोणी नसताना अल्पवयीन बहिणीवर बळजबरी बलात्‍कार करुन तिला कुमारी माता बनविणाऱ्या नराधम भावाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ४६ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी मंगळवारी (दि.२२ ) ठोठावली. विशेष म्हणजे गुन्‍ह्यातील रक्कमेपैकी २५ हजार रुपये हे पीडितेचे उपचार आणि पुर्नवसणासाठी देण्‍याचे देखील आदेशात नमुद करण्‍यात आले आहे.

या प्रकरणात १४ वर्षी पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, पीडिता ही आई-वडील व ३३ वर्षीय नराधम भावासह राहत होती. सन २०२० मध्‍ये पीडितेचा नराधम भाऊ हा सुरवातील पीडितेकडे अश्लिल नजरेने पाहत होता. त्‍यानंतर तो वाईट उद्देशाने बळजबरी पीडितेच्‍या शरिराला स्‍पर्श करित होता. डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान नराधम हा सेक्युरिटी मध्‍ये काम करित असताना दुपारी तो घरी आला, त्‍यावेळी घरात कोणी नव्‍हते. संधी साधत आरोपीने पीडितेला उचलून घरातील कॉटवर नेले. पीडितेने प्रतिकार केला मात्र त्‍याने पीडितेला धमकी दे‍त तिच्‍यावर अत्‍यावर केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्‍याची धमकी दिली. या घटनेनंतर आरोपीने पीडितेवर दोन-तीन वेळी अत्याचार केला.

जुलै २०२१ मध्‍ये पीडितेचे पोट दु:खत असल्याने तिला आई-वडीलांनी एका खासगी रुग्णालयात नेले होते. त्‍यावेळी पीडिता सात महिन्‍यांची गर्भवती असल्याचे समोर आले. पीडितेच्‍या आई-वडीलांनी चौकशी केली मात्र पीडितेने भिती पोटी त्‍यांना काही सांगितले नाही. त्‍यानंतर नराधमाने पीडितेला सांगितले की, आई-वडीलांना मुंबईचा मुलगा आहे असे खोटे सांग, मुलाचा सांभाळ आपण करु अशी थाप मारली. त्‍यानूसार पीडितेने आई-वडीलांना मुंबईचा मुलगा असून तो मला सोडून गेला, त्‍याचे नाव व पत्‍ता माहिती नसल्याचे सांगितले.

पीडिता करणार होती आत्‍महत्‍या

पीडिता ही गर्भवती असल्याने लोकांना कडून होणारी विचारणे मुळे तीला नैराश्‍याने ग्रासले होते. नेहमी होणार्या विचारण्‍याने तीने आत्‍महत्‍या करण्‍याचे ठरवले होते. मात्र पीडितेच्‍या आई-वडिलांनी व नराधमाने आपण मुलाचा संभाळ करुन असे सांगितले. तेंव्‍हा पीडितेने आत्‍महत्‍या करण्‍याचे टाळले.

असे फुटले बिंग

पीडितेला असाह्य कळा येत असल्याने तिला आई व नाराधमाने एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. रुग्ण दाखल करतांना नराधमाने पीडितेचे वय व नाव चुकूचे नोंदवले. दरम्यान त्‍याच दिवशी पीडितेने मुलाला जन्‍म दिला. त्‍याची नोंद करण्‍यासाठी डॉक्टरांनी पीडितेचे आधार कार्ड मागितले. आधारकार्ड हाती आल्यानंतर पीडितेचे नाव व वय खोटे असल्याचे समोर आले. डॉक्‍टारांनी सिटीचौक पोलिसांशी संपर्क साधून एमएलसी नोंदवली.

आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी, ४६ हजारांचा दंड

प्रकरणात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वंदना मुळे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी लोका आभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात डॉक्टरांनी दिलेली साक्ष महत्‍वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ३७६ (२) अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्‍वये ३ वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, पोक्सोच्‍या कलम ४ आणि २ अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपयांचा दंड, कलम ६ अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन जमादार रज्जाक शेख यांनी काम पाहिले.