संतांच्या सत्संगातच खरी शांती – राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी

वैजापूर, १७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- या भूतलावरील जो व्यक्ती संतांच्या सत्संगात राहतो त्यालाच जीवनात खरी शांती मिळते असे अमृत वचन राष्ट्रसंत आचार्य पुलकसागरजी महाराज यांनी गुरुवारी (ता.17) येथील जैन स्थानकात आयोजित प्रवचन कार्यक्रमात केले.    

ते पुढे म्हणाले की, जिवंतपणी जो व्यक्ती आपल्या  जीवनात सर्वांशी स्नेहपूर्वक,सद्भाव, सदवर्तनाने, सद् विचार व प्रामाणिकतेने राहतो व जिवंतपणी आपल्या जीवनात स्वर्ग निर्माण करतो त्याव्यक्तीला मृत्यूनंतर ही स्वर्ग मिळतो. महिलांविषयी ते म्हणाले की, महिलांनी दुसऱ्याचे अपशब्द  सहन करण्याची क्षमता विकसित केली तर त्यांच्या जीवनात सदा सर्वदा सुख, समृद्धी व समाधान लाभते.

या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उद्योगपती जीवनलाल संचेती, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, निलेश पारख, प्रशांत कंगले, साईनाथ मतसागर, प्रकाश बोथरा, राजेश संचेती, शोभचंद संचेती, धोंडीरामसिंह राजपूत, भगवान साळुंके, बाळासाहेब चव्हाण, हेमंत संचेती यांच्यासह शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय कासलीवाल यांनी संचलन केले. डॉ. संतोष गंगवाल यानी आभार मानले.