औरंगाबादेत कोरोनाबाधितांचे पुन्हा त्रिशतक ,चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 12998 कोरोनामुक्त, 4068 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 165 जणांना (मनपा 91, ग्रामीण 74) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12998 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 328 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17632 झाली आहे. आजपर्यंत एकूण 566 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4068 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुपारनंतर 205 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 58, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 83 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

घाटीत खडकेश्वर येथील 59 वर्षीय स्त्री, रांजणगावातील जय भवानी चौक परिसरातील 55, सिल्लोड तालुक्यातील शास्त्री नगरातील 62 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घाटीत छावणीतील 65 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सिटी एंट्री पॉइंट (58) करमाड (1), दौलताबाद (1), सातारा परिसर (3), एन आठ (3), पवन नगर (1), गारखेडा परिसर (1), एल अँड टी कंपनी परिसर (1), सावंगी (1), भगतसिंग नगर (2), सिल्लोड (3), सनी सेंटर (3), हर्सुल (1), मिसारवाडी (1), व्यंकटेश नगर (1), जाधववाडी (1), कन्नड (2), चिकलठाणा (5), भावसिंगपुरा (1), रांजणगाव (2), बजाज नगर (3), फारोळा (1), बीड बायपास (1), नक्षत्रवाडी (4), प्रकाश नगर (1),बिडकीन एमआयडीसी (6), गंगापूर (2), झाल्टा (1), विहामांडवा (1), अन्य (4)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *