राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख शिवसेनेत

Image

मुंबई :आज शिवसेना पक्ष प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री @GadakhShankaraoयांनी​ ​शिवसेना पक्ष प्रवेश केला​. ​यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.उस्मानाबाद जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत.

शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतूत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील अशी प्रतिक्रिया शंकरराव गडाख यांनी दिली.

कोण आहेत शंकरराव गडाख

मंत्री श्री. शंकरराव गडाख यांचा परिचय

Ø  नाव                 : शंकरराव यशवंतराव गडाख

Ø  जन्म                 : 29 मे, 1970

Ø  शिक्षण             : बी. कॉम

Ø  पक्ष                  : शिवसेना

Ø  मतदारसंघ        : 221-नेवासा

Ø  इतर माहिती      : विधानसभा सदस्य, ऑक्टो. 2009 पासून ते 2014 पर्यंत; संचालक, अ. नगर जिल्हा सह. बँक लि . अ . नगर 2007 ते 2016;

चेअरमन, अ. नगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप. बँक लि. 2007 ते 2008; चेअरमन – मुळा सह. साखर कारखाना लि . सोनई 1994 ते 2005; संस्थापक, मुळा सहकारी बँक लि. सोनई; संस्थापक, ‘ मुळा बाजार ‘ मुळा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था लि. सोनई संस्थापक, नेवासा तालुका सह. दूध संघ लिमिटेड सोनई; विश्वस्त, मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई;

Image

नेवासा तालक्यातील शेतकऱ्यांच्या पाटपाणी व वीजेच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलने केली; नेवासा तालुका मार्केट कमिटीच्या घोडेगाव उप आवारात शेतकऱ्यांच्या सोईसाठी मोठ्या उलाढालीचे कांदा मार्केट सुरु; पांढरीपुल एम. आय. डी. सी. कार्यान्वीत होण्यासाठी सातत्याने प्रयत्न; जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गटांचे संघटन; जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षीय काळात शेती, शिक्षण व महिला बचत गटांचे बाबतीत सुवर्ण महोत्सवी निर्णय घेण्यात पुढाकार; मुळा कारखान्याचा 30 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात पुढाकार; मुळा कारखान्याचे अध्यक्षीय काळात कारखान्यास सलग 2 वर्षे V. S. I. कडून उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचे पुरस्कार; सन 2003 चे दुष्काळात 6000 जनावरांसाठी छावणी चालविली; संघटनात्मक कामासाठी वेळोवेळी युवक व शेतकरी मेळाव्यांचे आयोजन; नियंत्रणाखालील संस्थांच्या माध्यमातुन प्रभावी जनसंपर्क; सार्वजनीक ठिकाणी लोकांना भेटून अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न व त्यासाठी स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *