औरंगाबादेत ६ बाधितांचा मृत्यू,२५६ नवे कोरोनाबाधित

औरंगाबाद:औरंगाबाद, दि.04 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 139 जणांना (मनपा 108, ग्रामीण 31) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 11368 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 256 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15150 झाली आहे. आजपर्यंत एकूण 493 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3289 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळनंतर 158 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 44, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 39 आणि ग्रामीण भागात 69 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

जिल्ह्यातील ४८ ते ६९ वयोगटातील सहा करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ४९३ झाली आहे. त्याचवेळी मंगळवारी दिवसभरात २५६ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १५,१५० झाली आहे.

जिल्ह्यातील शिऊर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला सोमवारी (३ ऑगस्ट) वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातून घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला. जाधववाडी येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाला २१ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा मंगळवारी (४ ऑगस्ट) दुपारी पावणेतीन वाजता मृत्यू झाला. त्याचवेळी शहर परिसरातील संत ज्ञानेश्वर नगरातील ४८, बजाज नगरातील ६९ आणि गंगापूर तालुक्यातील शेंदूरवाद्यातील ५० व रांजणगावातील हनुमान नगरातील ६९ वर्षीय पुरुष करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ३७४, तर जिल्ह्यात ४९३ बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *