चुकीमुळे अपात्र झालेल्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

वैजापूर,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- प्रधानमंत्री घरकुल योजनेत नाव समाविष्ट नसलेले किंवा ऑनलाईनच्या चुकीमुळे जे अपात्र झाले होते  अशा सर्व वंचित आणि पात्र धारक नागरिक यांनी आपल्या ग्रामपंचायत चे सरपंच, सदस्य ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांना संपर्क साधून आपले कागदपत्रे जमा करावीत. असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांनी केले आहे.

प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील नागरिकांसाठी ही महत्वाची संधी आहे. त्यामुळे चूकीमुळे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी  लवकरात लवकर आप आपल्या ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधावा. तसेच या प्रक्रियामध्ये जर काही समस्या निर्माण होत असेल तर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनाजी पाटील मिसाळ यांनी केले आहे.