वैजापुरात “हर घर तिरंगा” कार्यक्रमांतर्गत मौलाना आझाद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जागृती रॅली

वैजापूर,​८​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-“हर घर तिरंगा” कार्यक्रमाचे नियोजन व जनजागृती यासाठी वैजापूर पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी(ता.8) शहरातून फेरी काढून जनजागृती केली.राष्ट्रगीत पूर्वतयारी व नागरिकांना हर घर तिरंगा याविषयीची संपूर्ण माहिती पालिकेचे माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी यावेळी शालेय विद्यार्थी व नागरिकांना दिली. याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी हेमंत उशीर यांनी या फेरीला हिरवा ध्वज दाखविला.-शहराच्या विविध भागात हातात बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी “हर घर तिरंगा” बाबत जागृती केली. मुख्याध्यापक जी.जी. राजपूत, नीता पाटील, एम.आर.गणवीर, सुवर्णा बोर्डे, वैशाली पगारे, लता सुखासे,ज्योती दिवेकर, संदीप शेळके,राठोड यांनी यासाठी पुढाकार घेतला.