एकाच दिवसात 51,225 कोविड–19 चे रुग्ण बरे होण्याचा भारताचा उच्चांक
बरे झालेली रुग्णसंख्या 11.50 लाख
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2020
गेल्या 24 तासात 51,000 पेक्षा रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. 51,225 रुग्ण बरे होऊन घरी सोडले असून कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या सध्या 11,45,629 एवढी आहे. गेल्या 24 तासात एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्ण बरे झाले असून परिणामी रुग्ण बरे होण्याचा दर 65.44% या नवीन उच्चांकापर्यंत पोहोचला आहे. याचाच अर्थ असा की जास्तीत जास्त कोविड-19 चे रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी सोडले जात आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी एकत्रितपणे केलेले कोविड-19 चे व्यवस्थापन आणि सर्व आघाडीचे आरोग्य आणि इतर कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील कोविड योध्यांच्या नि:स्वार्थ त्याग, रुग्णसंख्या बरी होण्याच्या प्रमाणात वाढ सुनिश्चित करते.

रुग्ण बरे होण्याची संख्या आणि सक्रिय रुग्णसंख्या यामधील तफावतीत निरंतर वाढ दिसून आली आहे. 10 जून 2020 रोजी पहिल्यांदा बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1,573 च्या फरकाने सक्रीय रूग्णांपेक्षा अधिक होती जी आजपर्यंत वाढून सध्या 5,77,899 वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णसंख्या हि भारतातील वास्तविक रुग्णसंख्या असून सध्या सक्रिय रुग्ण 5,67,730 आहेत म्हणजेच एकूण रुग्णसंख्येच्या 32.43% इतके आहेत आणि हे सर्वजण रूग्णालयात किंवा घरगुती अलगीकरणामध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
प्रभावी प्रतिबंध धोरण, वाढ्त्या चाचण्या आणि प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन मानकांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या परिणामामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्यपूर्ण वाढत आहे आणि मृत्युदर उत्तरोत्तर कमी होत आहे. जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतात रुग्णांचा मृत्यूदर (सीएफआर) 2.13% म्हणजे सर्वाधिक कमी असणाऱ्यांमध्ये आहे.


इतर अपडेट्स:
- देशभर असलेल्या महामारीच्या व्यवस्थापनात, आठवडा ते महिना या काळात होणाऱ्या संसर्गाच्या संभाव्य संख्येचा अंदाज लावणे आणि या आकड्याचा वापर करून देशातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींचे पूर्वानुमान लावणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अडव्हान्स सायन्टिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर), आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) यांनी मिळून कोविड-19 चा प्रारंभिक टप्प्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि धोरण ठरविण्यासाठी एक मॉडेल विकसित केले आहे.
- भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच, रेल्वे मंत्रालयाने 31 जुलै 2020 रोजी सेवानिवृत्त झालेल्या 2320 अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. कोविड काळात मालवाहतूक रेल्वे, पार्सल, श्रमिक विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. संक्रमण परिस्थितीत देशसेवा करण्यासाठी रेल्वेने सर्वतोपरी प्रयत्न केले. रेल्वे कर्माचारी कोरोना योद्ध्यांपेक्षा कमी नाहीत. कोविड विरोधातील लढाईत प्रयत्नांची शर्थ केल्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो” असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल याप्रसंगी म्हणाले.
- ‘आत्मनिर्भर भारत’चे लक्ष्य साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना उदारीकृत नियामक वातावरण निर्माण करुन देण्यासाठीच्या धोरणाविषयी विचारांसंदर्भात कार्यशाळा संपन्न
- जवळपास 87,500 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा
- थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त ‘लोकमान्य टिळक- स्वराज ते आत्मनिर्भर भारत’ या दोन दिवसाच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन.