औरंगाबाद जिल्ह्यात 10601 कोरोनामुक्त, 3248 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि.01 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 409 जणांना (मनपा 372, ग्रामीण 37) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 10601 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 204 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14327 झाली आहे. आजपर्यंत एकूण 478 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3248 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 133 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 20, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 34 आणि ग्रामीण भागात 75 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत वाळूजमधील बजाज नगरातील 45, रांजणगावातील 65, सिल्क मिल कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला