श्रीक्षेत्र सराला बेटचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराजांकडून पूरस्थितीची पाहणी

वैजापूर,१४ जुलै /प्रतिनिधी :- नाशिक जिल्ह्यात धरणातुन  सोडलेल्या पाणी व मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरला बेटावर महंत रामगिरी महाराज यांनी अतिशय साध्या पद्धतीने गुरुपोर्णिमा साजरी केली. त्यांनी पुर परिस्थितीची पाहणी केली. गुरुपौर्णिमा व्यासपूजन निमित्त श्री क्षेत्र सरला बेट येथे नियोजित कार्यक्रम झाले नाहीत.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या भागातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने बेटाकडे येण्यास भाविकांना मज्जावकारात घरीच गुरुपौर्णिमा साजरी करण्याचे आव्हान महंत रामगिरीजी महाराज यांनी आपल्या लाखो भाविकांना आपल्या घरीच गुरुचे स्मरण करून पूजा विधी करण्यास सांगितले होते त्यामुळे महंत रामगिरीजी महाराज यांनी बेटातील योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज ब्रह्मलीन नारायण गिरी महाराज यांच्या समाधी स्थळावर जलाभिषेक करून व्यासपूजन गुरुपौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी केली तर नंतर परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी केली.

याप्रसंगी उपस्थित असलेले माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांनी भाविकांच्या सुविधेसाठी श्री क्षेत्र सरला बेटावर मोठा उंचीचा पूल बांधावा जेणेकरून भाविकांना सुलभता येईल यासाठी भाविकांच्या  वतीने त्यांनी सरकारकडे मागणी केली .याप्रसंगी याप्रसंगी आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी अर्थ बांधकाम सभापती संतोष जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी ,बंडू पाटील वाणी, उद्योजक महेंद्र गोडगे ,बाळकृष्ण कापसे, सचिन दिघे ,बाबासाहेब कांदळकर, बाबासाहेब दिघे ,दत्तू पाटील खपके, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदी उपस्थित होते