वैजापूर येथे श्री.स्वामी समर्थ सारामृत चरित्र वाचन

वैजापूर,१३ जुलै /प्रतिनिधी :-येथील पाटील गल्ली येथे असलेल्या श्री स्वामी समर्थबाल संस्कार केंद्रात “गुरू पौर्णिमा”  निमीत्त गुरु माऊली श्री. स्वामी समर्थ  सारामृत गुरूचरित्र पारायण बुधवारी (ता.13) सकाळी आठ वाजल्यापासून आरंभ झाले. सव्वाशे भक्त भाविक या गुरू चरित्र पारायनात सहभागी झाले आहेत. गुरू पौर्णिमेमुळे दिवसभर गुरु चरित्र पारायण होणार आहे.

मुख्यवाचिका कविता पूरी, सोनाली त्रिभुवन, श्री. स्वामी समर्थ चरित्र पारायण वाचीत आहेत. केंद्राचे मार्गदर्शक माजी नगरसेवक लिमेश वाणी, सुरेश आलूले, तुषार अनर्थे, अरविंद तुपे, धोंडीरामसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरू पोर्णिमाचा केंद्रात कार्यक्रम होत आहे. यात श्री. स्वामी समर्थ भक्त आकाश पारे, विक्रम देवकर, श्रेयश चव्हाण, वाल्मिक, रणवीर राजपूत, संदीप मोटे, गणेश संतपाळ, यश खांबेकर, राहुल पडवळ, अदमाने, सागर त्रिभुवन, चंदा पोटे, शोभाबाई राजपूत, जैन,बडे सर, प्रशांत गायकवाड, देवेंद्र साळुंके यांनी सहभाग नोंदविला.;श्री दत्त मंदिर, श्री महादेव मंदिर येथेही गुरू पौर्णिमा निमित्त गुरू पूजन व महाप्रसाद कार्यक्रम झाला.