सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाची कारवाई

1 हजार 969 व्यक्तींकडून 4 लाख 39 हजार 950 रुपयांचा दंड वसुल

जालना,दि. 29 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.29 जुलै, 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 1 हजार 969 व्यक्तींकडून 4 लाख 39 हजार 950 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

यामध्ये जालना तालुक्यात 237 व्यक्तींकडून 91 हजार 900 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 347 व्यक्तींकडून 66 हजार 700, भोकरदन 180 व्यक्तींकडून 36 हजार रुपये, जाफ्राबाद 206 व्यक्तींकडून 41 हजार 500, अंबड 237 व्यक्तींकडून 66 हजार 250, घनसावंगी 87 व्यक्तींकडून 5 हजार 700, परतुर 29 व्यक्तींकडून 4 हजार 900 रुपये तर मंठ्यामध्ये 646 व्यक्तींकडून 1 लाख 27 हजार अशा प्रकारे एकुण 1 हजार 969 व्यक्तींकडून 4 लाख 39 हजार 950 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *