सरकार पडत असताना छत्रपती संभाजीराजेंनी करून दिली ‘ती’ आठवण!

मुंबई,२९ जून  /प्रतिनिधी :- शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वाढलेली आहे. राज्यपालांनी ३० जुलै रोजी आपले बहुमत सिद्ध करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारला दिले आहे. याच पार्श्वभूमीवर, मराठा आरक्षणाबाबत आश्वासनांची आठवण करून देणारे ट्विट छत्रपती संभाजीराजेंनी केले आहे.

Image


 “गेल्या काही दिवसांत शासनाने अनेक GR काढले आहेत. मात्र मराठा आरक्षण व आझाद मैदानावरील उपोषणावेळी समाजाला दिलेली आश्वासने शासनाने विसरू नयेत. शासकीय नोकरीत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या मराठा उमेदवारांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा GR देखील काढावा.” असे म्हणत संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.