कोविडसंदर्भात राज्यात २ लाख १ हजार गुन्हे दाखल
मुंबई दि. २२ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३१ हजार ३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख २३ हजार ४४१ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २१ जुलै या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१५ (८८१ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८८१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८९
(मुंबईतील ४८ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५१, ठाणे शहर ७ व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी,
रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी,नवी मुंबई SRPF १,पालघर २,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १, जालना ग्रामीण १, नवी मुंबई १,)
कोरोना बाधित पोलीस – १८५ पोलीस अधिकारी व १३९८ पोलीस कर्मचारी