राज्यातील बदलीच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका खंडपीठाने फेटाळली
औरंगाबाद , दि. २० :राज्य शासनाच्या १५ टक्के बदल्याचा निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीअंती खंडपीठाने याचिका पेâटाळून लावत याचिकाकर्त्याच्या अनामत रक्कमेतील ५० हजार रुपये कोविड रुग्णालयास वर्ग करण्याचे आदेश न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी दिले.
राज्यामध्ये कोरोनाचे प्रादुर्भाव वाढलेला असताना देखील १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने ७ जुलै रोजी जाहिर केला होता. या निर्णया सामाजिक कार्यकर्ते संदीप मोहन वायसळ पाटील यांनी अॅड. राजेंद्र गोडबोले यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते. राज्यामध्ये एप्रिल – मे महिन्यात बदल्या होतात. बदल्याचा आध्यादेश राज्यपालांनी जारी करावा लागतो, तरी देखील अचानक बदल्या करण्यात आल्या शासनाचा बदलीसंबंधीचे आदेश बदली कायदा २००५ शी विसंगत असल्याचे जनहित याचिकेत नमुद करण्यात आले. या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली असता खंडपीठाने १५ टक्के बदल्या केल्या असून ज्याना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तो न्यायालयात दाद मागेल, या याचिकेत कुठेही जनहित दिसून येत नसल्यामुळे याचिकाकत्र्याने जमा केलेल्या १ लाख ५० हजार रुपयाच्या अनामत रक्कमेपैकी ५० हजार रुपये कोविड रुग्णालयात वर्ग करावेत असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. राजेंद्र गोडबोले यांनी तर सरकारच्या मुख्य सरकारी वकील अॅड. डी. आर. काळे यांनी बाजू मांडली.