राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे औरंगाबाद येथे आगमन

औरंगाबाद ,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी  चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद येथे आगमन झाले.

यावेळी विमानतळावर आ. हरिभाऊ बागडे, आ.अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह इतर मान्यवरांनी  राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.