“महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन

औरंगाबाद ,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, बुधवार दि 27 एप्रिल 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी  होणार आहे.

            महिलांना न्याय मिळावा, यासाठी “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या संकल्पने अंतर्गत आयोगाकडे दाखल असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील तक्रारींची सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. याच बरोबर नव्याने आलेल्या तक्ररींवरही कार्यवाही करण्यात येणार आहे.

            सुनावणी, तक्रारींसाठी मुंबई कार्यालायात येणे शक्य नसलेलया महिलांना याचा फायदा होणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत दाखल तक्रारींची सुनावणी आणि नव्या तक्रारीवर कार्यवाही होणार असुन बुधवार दि. 27 एप्रिल 2022, सकाळी 11.30  नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा औरंगाबाद, जनसुनावणी होणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी दिपा ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.