औरंगाबाद शहरातील जुन्या वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करा – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

औरंगाबाद,६ एप्रिल / प्रतिनिधी :- औरंगाबाद शहरातील जुन्या वसाहतीमधील पाणीपुरवठा जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आवश्यक पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे शहरातील जुन्या वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करा,अशी सूचना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनपा अधिकाऱ्यांना केली.

बुधवारी समर्थनगर पुष्पनगरी, शक्तीनगर भागात पाहणी करुन त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, पाणीपुरवठा अभियंता सीताराम गायकवाड, सुमित बोराडे, नागरिक डॉ. जीवन राजपूत, शाह आदी उपस्थित होते.