औरंगाबादच्या क्रांती चौक पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लवकरच हस्तांतरण – मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,२३ मार्च  /प्रतिनिधी :-औरंगाबाद येथील क्रांती चौक उड्डाण पुलाची उभारणी रस्ते विकास मंडळामंडळामार्फत करण्यात आली असून याची दुरुस्ती व देखभालही याच महामंडळामार्फत करण्यात येत आहे. या पुलावरील रबरी भाग निघाला असून त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. या पुलाची एमआयटीच्या प्राध्यापकांद्वारे पाहणी करण्यात आली असून या पुलाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आता सदरचा हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, सुनिल शिंदे यांनी उपस्थित केला होता.