युवा पिढीकडून बंजारा समाज होळी उत्सवाची जपवणूक समाधानकारक : माजी मंत्री अर्जुन खोतकर

जालना,१५ मार्च  /प्रतिनिधी :- रंगाची उधळण करणारा होळी सण बंजारा समाजात आगळ्या -वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हीच गौरवशाली परंपरा नवीन पिढी जतन करत असल्याने संस्कृती अधिक वृध्दिंगत होईल. असा विश्वास  शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला. 

अंबड रोडवरील मातोश्री कॉलनी  भागात सुरू असलेल्या होळी उत्सव कार्यक्रमात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी भेट देऊन गीतांवर ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला. या वेळी पंडितराव भुतेकर, माजी जि. प. सदस्य उध्दव पवार,जि.प.सदस्य संजय राठोड, डॉ. सुधाकर जाधव,कैलास चव्हाण, मोहन राठोड,नंदू नेनावत,यांची प्रमुख उपस्थिती होती. 
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी संपूर्ण देशभरात  होळी उत्सवाचे  बंजारा समाज बांधवांनी आपले वेगळे पण पुर्वी पासून जपले असून  महिनाभर सुरू असलेल्या या उत्सवात आपण नेहमी सहभागी होत असल्याने वेगळा आनंद मिळतो. असे श्री. अर्जुनराव खोतकर यांनी नमूद केले. 

Displaying 1647337113987.jpg

प्रारंभी समाज बांधवांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कैलास चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी बंडू राठोड,प्रविण राठोड, विजय राठोड, राजू राठोड ,अनिल चव्हाण, सागर राठोड, राजू चव्हाण, सरपंच छबुराव राठोड, बाबुराव राठोड, श्याम राठोड, कैलास जाधव, सुरेश राठोड, अभय राठोड ,संजय राठोड, सतीश चव्हाण, विकास चव्हाण ,सुधीर पवार, बंकट राठोड, आयुष राठोड,  ॲड. सुभाष राठोड, गुलाब राठोड ,भारत राठोड, पृथ्वीराज राठोड, विश्वनाथ चव्हाण ,चेतन राठोड, गंगाराम राठोड ,अंकुश पवार, विजय राठोड,पो. कॉ. विजय पवार, गोपाल राठोड, विष्णू राठोड ,संदीप राठोड, तुकाराम चव्हाण ,उ.ला.पवार, अभय जाधव यांच्यासह गोर बंजारा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.