औरंगाबाद जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

औरंगाबाद,१० मार्च / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 5 जणांना (मनपा 5) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 918 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 6 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 699 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 732 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 49 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (3)

छावणी 2, हर्सूल कारगृह परिसर 1, अन्य 1

ग्रामीण (3)

गंगापूर 2, पैठण 1