अन्नधान्याच्या साठेबाजारावर नियंत्रण आणावे-अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

औरंगाबाद,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-पुरवठा विभागाने नागरिकांना मुबलक प्रमाणात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अनधिकृत बायोडिझेल निर्मिती विक्री करण्याऱ्यांवर महसूल व पोलिस प्रशासनानी कारवाई करावी असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिले.

Displaying WhatsApp Image 2022-02-25 at 7.06.54 PM.jpeg

या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे, सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे अनिलकुमार दाबशेडे, कृषी उत्तन्न बाजार समितीचे एस.एस. बनसोडे व पोलिस उपअधिक्षक प्रकाश चौगुले, तसेच सामितीचे इतर अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्य, पेट्रोल व तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत व रास्त भावात उपलब्ध व्हावा यासाठी खाजगी वखारात होणारा अनाधिकृत अन्नधान्य साठा बाबत विभागाच्या अधिकांऱ्यानी तपासणी करावी व साठेबाजी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

त्याचप्रमाणे तृतीयपंथीय व वेश्या व्यवसायातील महिलांसाठी शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करावी . वंचित व गरजू व्यक्तीना लाभ मिळावा यासाठी सर्व रास्त भाव दुकानदार यांच्या मार्फत समाजातील दिव्यांगांना व अनाथ  तृतीयपंथीय यांना अन्न धान्य मिळणासाठी शिधापत्रिका वाटप करावे यासाठी विशेष मेळावा उपक्रमातून संबंधिताना लाभ मिळवून देण्याचे निर्देश डॉ. गव्हाणे यांनी दिेले.