औरंगाबाद जिल्ह्यात 158 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 332 जणांना (मनपा 257, ग्रामीण 75) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 61 हजार 668 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 158 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 717 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 716 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 333 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (108)

सिडको 2, घाटी परिसर 2, एन- 6 येथे 2, छाया नगर 1, एन-7 येथे 1,  एन- 8 येथे 1, मयुर पार्क 1, एन -9 येथे 1,  एन- 1 येथे 2, शहा बाजार 1,  एन-4 येथे 4, इंदिरा नगर 1, सातारा परिसर 1, एन- 3 येथे 1,  एन -2 येथे 1, मुकूंदवाडी 1,  रामनगर 1, शिवाजी नगर 1, हनुमान नगर 1, रविंद्र नगर 1, बीड बायपास परिसर 1, ज्योती नगर 1, समर्थ नगर 2, न्यु उस्मानपुरा 1, इटखेडा 1, राजाबाजार 1, कैसर कॉलनी 1, नंदवन कॉलनी 1, जालन नगर 1, टिळक नगर 2, भागीरथ नगर 1, खडकेश्वर 1, केंद्रीय विद्यालय परिसर 1, पुंडलिक  नगर 1, एन – 11 येथे 1, खिवंसरा 2,  उल्कानगरी 1, अन्य 61

ग्रामीण (50)

मृत्यू  (02)

घाटी (02)

1.     59 स्त्री, पैठण ता.पैठण

2.    90 पुरुष, पाचलगाव ता.पैठण