कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही,कुख्‍यात आरोपी इम्रान मेहंदी याची अंडसेलमधून केली सुटका

औरंगाबाद,३० जानेवारी / प्रतिनिधी :-  कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही.रुबीनाने वकील रुपेश जैस्वाल यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत महाराष्ट्र कारागृह कायदा, 1894 नुसार कैद्यांना एकांतात ठेवण्याची वैधानिक अनुज्ञेय मुदत केवळ 14 दिवस असल्याचे निदर्शनास आणून दिले.विविध खून खटल्यातील कुख्‍यात आरोपी इम्रान शेख नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहंदी याला अंडसेल मध्‍ये ठेवल्याने त्‍याचे मानसिक संतूलन बिघडत असल्याने त्‍याला अंडासेलमधून हलवावी यासाठी त्‍याच्‍या पत्नीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर नुकत्‍याच झालेल्या सुनावणीवेळी महेंदीला तात्काळ अंडासेलमधून हलवावे असे आदेश जेल प्रशासनाला न्‍यायमुर्ती व्‍ही.के. जाधव आणि संदिपकुमार मोरे यांच्‍या खंडपीठाने दिले.

याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने अशा प्रकारे दोन वर्षांहून अधिक काळ कुठल्याही आरोपीला एकांतवासात ठेवण्याचा प्रकार फारच धक्कादायक असल्याचे महत्त्वपूर्ण मत नोंदवले. मुळात आरोपीला 14 दिवसांपेक्षा अधिक काळ अंडा सेल अर्थात एकांतवासात ठेवता येते. 1984 च्या महाराष्ट्र तुरुंग कायद्यात तशी तरतूद आहे, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले.

शिवाय कैदी इम्रान मेहंदीची भेट घेवून त्‍याचा जबाब नोंदविण्‍याचे आणि फोटो ग्राफरला सोबत घेवून अंडासेलचे फोटो काढून त्‍याचा अहवाल सोमवार दि.३१ जानेवारी रोजी सादर करण्‍याचे निर्देश खंडपीठाने जिल्हा न्‍यायालयातील मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी यांना दिले.

तसेच शासकिय वैद्यकिय महाविद्याल आणि रुग्णालयाच्‍या अधिष्‍ठातांनी तीन डॉक्टरांचे पथक नेमावे. त्‍या पथकाने शुक्रवारी दि.२९ कैद्याची वैद्यकिय तपासणी करुन त्‍याचा अहवाल ३१ जानेवारी रोजी न्‍यायालयात सादर करावा असे निर्देश देखील खंडपीठाने दिले.

सलीम कुरेशीसह पाच जणांची हत्या करणार्या कुख्यात गुन्हेगार तथा सुपारी किलर इम्रान शेख नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहंदी याला मकोकाच्‍या दोन खटल्याच शिक्षा ठोठाविण्‍यात आली आहे. या शिक्षेदरम्यान त्‍याला तब्बल दोन वर्षे चार महिने अंडासेल मध्‍ये ठेवण्‍यात आले. यामुळे त्‍याचे मानसिक संतुलन बिघडले असून इम्रान मेंहदीला अंडासेल मधुन हलवावले अशी विनंती करणारी याचिका इम्रान मेंहदीची पत्‍नी शेख रुहिना हिने अॅड. रुपेश जैस्‍वाल यांच्‍या मार्फत दाखल केली आहे. याचिकेनूसार, इम्रान मेहंदीला २०१८ मध्‍ये खूनाच्‍या गुन्‍ह्यात विशेष जिल्हा व सत्र न्‍यायालयाने शिक्षा ठोठावली. त्‍यानंतर मेहंदीला तब्बल दोन वर्षे चार महिने हर्सुल कारागृहातील अंडासेलमध्‍ये ठेवण्‍यात आले. याविरोधात मेहंदीने १५ सप्‍टेंबर २०२१ रोजी कारागृह अधिक्षकांना अर्ज करुन, अंडासेलमध्‍ये माझे मानसिक संतुलन बिघडले असून मला यातून बाहेर काढावे अशी विनंती केली. मात्र त्‍यावर कोणतीही कारवाई करण्‍यात आली नाही. त्‍यानंतर इम्रान मेहंदीला अंडासेल मधून हलवावे यासाठी त्‍याची पत्‍नी शेख रुहिना हिने कारागृह अधिक्षकांना अर्ज केला असता त्यावर देखील कोणतीही कारवाई करण्‍याता आली नाही. यानाराजीने शेख रुहिना हिने खंडपीठात धाव घेतली. मात्र आर्थिक अ‍डचणिच्‍या कारणावरुन शेख रुहिना हिने विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करुन वकील देण्‍याची मागणी केली. त्‍यावर विधी सेवा प्राधिकरणाने अॅड. रुपेश जैस्वाल यांची नियुक्ती केली.

याचिकेच्‍या सुनावणीवेळी अॅड. जैस्‍वाल यांनी कायद्यानूसार कैद्याने कारागृहीन गुन्‍हा केला तरच त्‍याला अंडासेल मध्‍ये ठेवले जाते, ते ही केवळ १४ दिवसांसाठी, मात्र प्रकरणात कैद्याला तब्बल दोन वर्षे चार महिने अंडासेल मध्‍ये ठेवण्‍यात आले. त्‍यामुळे कैद्याचे मानसिक संतूलतन बिघडत चालले आहे. या सर्व प्रकाराने संविधानिक हनन होत असल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले. शिवाय १९८७ च्‍या सुनिल बत्रा खटल्यात सर्वोच्‍च न्‍यायालयातील पाच न्‍यायाधिशांच्‍या पीठाने दिलेल्या निकालाचा दाखला देखील यावेळी अॅड. जैस्‍वाल यांनी न्‍यायालयात दिला.