दिलासा :औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झाले कमी, 687 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,२८ जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1 हजार 15 जणांना (मनपा 665, ग्रामीण 350) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 53 हजार 877 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 687 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 65 हजार 151 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 686 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण सात हजार 588 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 मनपा (493)

कॅन्सर हॉस्पिटल 1, घाटी परिसर 1, जिल्हा हॉस्पिटल परिसर 9,  गारखेडा परिसर 4, उस्मानपुरा 4,  एन-2 येथे 3, एन -4 येथे 3, ज्योती नगर 2, व्यंकटेश नगर 1, एन-1 येथे 3, पटेल नगर 1, सादात नगर 1, कांचनवाडी 1, बन्सीलाल नगर 12, इटखेडा 2, पडेगाव 3, समर्थ नगर 1, खडकेश्वर 1, जालन नगर 1, औरंगपुरा 1, एन-5 येथे 1, बीड बायपास 12, बिडकीन 1, पैठण रोड 1, वेदांत नगर 1, सिडको 1,‍ शिवाजी नगर 3, सातारा परिसर 1,चाणक्यपुरी 1, न्यु लक्ष्मी नगर 1,एमआयडीसी चिकलठाणा 1, चिकलठाणा 2, मुकुंदवाडी 1, एन-3 येथे 4, नारेगाव 1, हर्सुल 3, पिसादेवी 1, जयभवानी नगर 2, कॅनॉट परिसर 1, न्यु हनुमान नगर 1, उल्कानगरी 1,म्हाडा कॉलनी 4 अन्य 393      

ग्रामीण (194)

औरंगाबाद 54, फुलंब्री 4, गंगापूर 50, कन्नड 13, सिल्लोड 30, वैजापूर 22, पैठण 17, सोयगाव 4

मृत्यू  (05)

खासगी (05)

1.70 पुरुष, आनंदपूर, ता.पैठण

2. 77 पुरुष, रोटेगाव, ता.वैजापूर

3.81 स्त्री,जिवरग टाकळी ता.सिल्लोड

4.84 पुरुष, कटकट गेट, औरंगाबाद

5.71 पुरुष, कृष्ण नगर एन-9, औरंगाबाद