जालना तालुक्यातील चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित
जालना,२० जानेवारी / प्रतिनिधी :-
जालना तालुक्यातील चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत यात मौजे नाव्हा येथील साई समर्थ ट्रेडर्स, सर्वोदय ट्रेडर्स व अर्णव ट्रेडर्स धारकल्याण येथील भगवंत कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे हे सगळे दुकानदार दुकानात असलेल्या मालाची विक्री केली याची नोंद ठेवत नाहीत तसेच स्टाॅक फलक लावण्यात येत नाही संबंधित विक्री केली त्यांच्या सह्या घेत नाही असे आरोप आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी बी.एस.रणदिवे यांनी दिली.