औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 584 कोरोनामुक्त

औरंगाबाद,१०नोव्हेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज 14 जणांना (मनपा 07, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 584 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 12 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 304 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 619 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 101 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (03)
उल्कानगरी 1, अन्य 2
ग्रामीण (09)
गंगापूर 4, वैजापूर 5 घाटी (02)
मृत्यू (02)

  1. 58, पुरुष, वैजापूर
  2. 2.73, पुरुष, नाचनवेल, कन्नड