औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 485 कोरोनामुक्त, 119 रुग्णांवर उपचार
औरंगाबाद,३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज 27 जणांना (मनपा 10, ग्रामीण 17) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 485 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 216 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 612 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (17)
कांचनवाडी 1, देवळाई परिसर 2, अन्य 14
ग्रामीण (13)
औरंगाबाद 1, फुलंब्री 1, गंगापूर 8, खुलताबाद 1, वैजापूर 1, पैठण 1
मृत्यू (02)
घाटी (02)
1. 70 पुरुष, नंदनवन कॉलनी, औरंगबाद
2. 75 पुरुष, ता.गंगापूर जि. औरंगाबाद