१ लाख ३७ हजार गुन्हे दाखल; विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ३६ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. २८ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ३६ लाख १९ हजार ८६१  रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख ०२ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर  फौजदारी गुन्हे दाखल होणार – गृहमंत्री अनिल देशमुख

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख २३ हजार ६७७ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २७ जून या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २८५ (८६० व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ८३३ फोन

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख ०२ हजार ०८६.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८५ हजार २६९

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५७

(मुंबईतील ३६ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३७, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस,  ठाणे ग्रामीण १ पोलीस २ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)

कोरोना बाधित पोलीस – १०८ पोलीस अधिकारी व ८९३ पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *