औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 361 कोरोनामुक्त

औरंगाबाद,२५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 14 जणांना (मनपा 05, ग्रामीण 09) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45  हजार 361 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 09 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49  हजार 81 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 608 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.  

मनपा (05)

घाटी  परिसर 2, भवानी नगर 1, चिकलठाणा एमआयडीसी 1,  एन-2 येथे 1

ग्रामीण (04)

वैजापूर 2, पैठण 1, सिल्लोड 1

 मृत्यू (01)

घाटी (01)

1.      75, पुरुष, उखाद, ता.खुलताबाद