एक लाख ३६ हजार गुन्हे दाखल; ९ कोटी १८ लाखांचा दंड – गृहमंत्री

मुंबई दि. २७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३६ हजार २६८ गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी १८ लाख ०३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख १६ हजार ७०४ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २६ जून या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २८५ (८६० व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार फोन

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ४ लाख ६९ हजार २७५.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८४ हजार ८८७

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५७

(मुंबईतील ३६ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३७, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस,  ठाणे ग्रामीण २ पोलीस १ अधिकारी, जळगाव ग्रामीण१,पालघर १, जालना १ अधिकारी, उस्मानाबाद-१)

कोरोना बाधित पोलीस – १०५ पोलीस अधिकारी व ८७१ पोलीस कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *