औरंगाबाद जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 142 कोरोनामुक्त, 151 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 15 जणांना (मनपा 05, ग्रामीण 10) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45  हजार 142 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 882 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 589 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.  

मनापा (08)

घाटी परिसर 1, चिकलठाणा 1, सिडको एन पाच 1, गादिया विहार 1, सातारा परिसर 2, अन्य 2

ग्रामीण (08)

गंगापूर 3, खुल्ताबाद 1, वैजापूर 3, पैठण 1

 मृत्यू (01)

खासगी (01)

1.      77, पुरुष, हर्सुल